

Rain has eluded Kannad Taluka
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांपुढे संकट निर्माण झाले आहे. यंदा मान्सून तब्बल महिनाभर उशिरा दाखल झाल्यामुळे मृग नक्षत्रात पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. त्यानंतर झालेल्या जेमतेम पावसामुळे शेतकऱ्यांनी कापूस, मका, सोयाबीनसह विविध खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून त्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
कन्नड तालुक्यात खरीप हंगामातील एकूण ९३ हजार ३४८ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ८७ हजार ३४३ हेक्टर (९३.५७ टक्के) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पावसात खंड पडताच शेतकऱ्यांनी कापूस व मका पिकांमध्ये वखरणी, कोळपणी, निंदणीसह आवश्यक