राजकारण न करता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या: आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | पैठणच्या पाचोड परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
Aditya Thackeray statement
आदित्य ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. Pudhari News Network
Published on
Updated on

पैठण, पुढारी वृत्तसेवा: गद्दार सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात राजकारण न करता तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यात ते आज (दि. ४) बोलत होते.

आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी बांधावर जाऊन केली. यावेळी पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामा करून घेण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Aditya Thackeray statement
छत्रपती संभाजीनगर : हिवरखेडा - नांदगीरवाडी पुलावरून दुचाकीसह तरुण गेला वाहत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news