भागाठाण येथील शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Farmers in Bhagathan died due to electric shock
भागाठाण येथील शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यूFile Photo
Published on
Updated on

प्रतिनिधी लासुरस्टेशन : गंगापूर तालुक्यातील भागाठाण येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संजय कचरू आमराव (वय ५०) यांचे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेने भागाठाणसह पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Farmers in Bhagathan died due to electric shock
नांदेड : विजेच्या धक्क्याने पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू

दरम्यान मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांना विजेचा धक्का लागल्याने नातेवाईकांनी तात्काळ लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.चाटे यांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान बुधवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत शेतकऱ्याचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर भागाठाण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news