

Crops on 5,345 hectares damaged in Marathwada.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. या अवकाळी पावसाचा फटका विभागातील तब्बल ८ हजार ७८० शेतकऱ्यांना बसला आहे. विभागात एकूण ५३४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यासोबतच लहान मोठी ७७ जनावरे दगावली आहेत.
मराठवाड्यात ३० मार्चपासून अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागांत गारपीटही झाली. पावसामुळे मराठवाड्यातील २०९ गावे बाधित झाली आहेत. बीड जिल्ह्यात एका घराचीही पडझड झाली आहे.
कुठे किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान ?
छत्रपती संभाजीनगर ३३४०
जालना ५५९
परभणी 00
हिंगोली 00
नांदेड १८४
लातूर १२२१
धाराशिव