छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बालविवाह रोखण्यासाठी शासनस्थरावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमिताने जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी शाळा- महाविद्यालय व गावांना भेटी देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केले आहे.Child Marriage
याच अनुषंगाने जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मटास्क फोर्सफ्ची निर्मिती करण्यात आलेली आहे. या टास्क फोर्सच्या मासिक बैठकीचे आयोजन मंगळावारी (दि.९) अजिंठा सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सीईओ विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीला शिक्षण, आरोग्य, युनिसेफ, पोलिस, महानगरपालिका, पंचायत, विभागाचे विभाग प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत शिक्षण, आरोग्य, युनिसेफ या विभागाने बालविवाह प्रतिबंधसंदर्भात केलेल्या कामाचे सादरीकरण केले. यावेळी महिला व बाल कल्याणच्या सुवर्णा जाधव, युनिसेफच्या सोनिया हिंगे, मनपाचे महिला बालकल्याणचे उपायुक्त, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी रेशमा चीमेंद्र, साथरोग अधिकारी डॉ. सारिका लांडगे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लता जाधव, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीमाळी, सर्व तालुक्यांचे बालविकास प्रकल्प अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत सीईओ मीना यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या. यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक १०९८ गावातील दर्शनी भागावरील भिंतीवर लिहिणे, गावात तसेच झोपडपट्टी भागात बालविवाह प्रतिबंधक, प्रबोधनात्मक भिंती रंगविणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी गावात आयोजित शिबिरात बालविवाह प्रतिबंधक या विषयी जनजागृती करण्यात यावी, १०-१२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थिनींची बैठक घेऊन प्रबोधन करावे आदींचा समावेश होता.