![छ. संभाजीनगर: बाळापूर येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2FUntitled-design-T-.-1-181.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिंपळदरी, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील राजू दगडूबा गाडेकर (वय ३८) यांचा विहिरीमध्ये मोटर सोडत असताना पाय घसरून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२०) दुपारी दोन वाजता उघडकीस आली. बाळापूर शिवारातील त्यांच्याच शेतातील विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबत अजिंठा पोलीस ठाण्यामध्ये माहिती देण्यात आली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून बाळापूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पुढील तपास अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अक्रम पठाण, भागवत शेळके, संदीप कोथलकर करत आहे.