Chhatrapati Sambhajinagar|एरंडीच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा, वैजापूर तालुक्यात खळबळ

एरंडीच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा, वैजापूर तालुक्यात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar
एरंडीच्या बिया खाल्ल्याने १३ मुलांना विषबाधा झाली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar news

वैजापूर : तालुक्यातील कापूसवाडगाव येथे एरंडीच्या बिया खाल्ल्याने १३ लहान मुला-मुलींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१८) घडली. विषबाधा झालेल्या मुलांचे वय ३ ते १८ वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Jarange health News : उपोषणाने जरांगे यांची प्रकृती खालावली

मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबातील काही मुलांनी एरंडीच्या बिया खाल्ल्या. त्यानंतर त्यांनी या बिया गल्लीतील इतर मुलांनाही वाटल्या. बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलांना त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Chhatrapati Sambhajinagar
Sambhajinagar News : पोलिसांना न सापडलेला ३०-३० घोटाळ्यातील आरोपी ठेवीदारांनीच पकडला

एकाच वेळी १३ मुलांना विषबाधा झाल्याने कापूसवाडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या सर्व मुलांवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news