छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
"शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातामुळे झाला नाही, तर त्यांना मारलं गेल, हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो," असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. (Sanjay Shirsat on Anand Dighe)
शिरसाट म्हणाले, "आनंद दिघे हे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. तिथे उपचार घेऊन ते बरे झाले. त्यांना दुपारी डिस्चार्ज होणार होता. पण नंतर अचानक त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले."
अनेक नेत्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये होतो, पण ते हॉस्पिटल कधी बंद पडत नाहीत. नंद दिघेंचा मृत्यू झाला ते हॉस्पिटल अजूनही का सुरू होऊ शकले नाही? असा सवालही शिरसाट यांनी केला.
महाविकास आघाडीतील कुरघोडीवरही शिरसाट यांनी भाष्य केले. सध्या महाविकास आघाडीत कॉंग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. लोकसभेला आपल्यामुळेच उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार निवडून आले. मुस्लिम मतदार काही प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे वळला याची जाणीव त्यांना आहे. आपली वोट बँक कायमची शिफ्ट झाली तर आपले अस्तित्व येईल, हे कॉंग्रेसला कळून चुकले आहे, असेही शिरसाट म्हणाले. (Sanjay Shirsat on Anand Dighe)
शिरसाट यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांना शिवसेनेत कधीही महत्त्व नव्हते. त्यांचा एखादा आंदोलनात सहभागी असल्याचा फोटो कुणी मला दाखवावा, असे आव्हानही त्यांनी दिले. (Sanjay Shirsat on Anand Dighe)