

9,000 Patients Within City Limits Become TB-Free in Three Years
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक मिनिटाला दोन व्यक्ती क्षयरोगाने बाधित होत असल्याने शहर हद्दीत मागील तीन वर्षांत ९ हजार १०२ रुग्ण क्षयरोग (टीबी) मुक्त झाले आहेत. संशयितांचा शोध, निशुल्क निदान, जलद उपचार आणि जनजागृतीमुळे शहराची टीबी निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
दरवर्षी २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्व जगाला या आजाराची माहिती व्हावी यासाठी पाळला जातो. भारतामध्ये प्रत्येक मिनटाला दोन व्यक्ती क्षयरोगाने (बेडका दूषित) बाधित होतात. धुंकी दूषित असलेल्या एका क्षयरुग्णामुळे वर्षभरामध्ये इतर १०-१५ जणांना क्षयरोगाचा संसर्ग होतो.
शहरात मनपा हद्दीत मागील तीन वर्षांत ११ हजार ८० क्षयरोगी आढळून आले आहेत. या वर्षी आतापर्यंत म्हणजेच २३ मार्च २०२६ पर्यंत ८२० क्षयरोगी आढळून आले आहेत. या क्षयरोग्यांना त्वरित प्रत्यक्ष देखर 'खीखाली जलद औषधोपचार देण्यात आल्याने यापैकी तब्बल ९ हजार १०२ क्षयरोगी बरे होऊन क्षयरोग मुक्त झाले आहेत. तर, या तीन वर्षांत ४६५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
मोफत औषधोपचार, पोषण आहार
टीबी मुक्तीचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व क्षयरुग्णांना बेडका तपासणी व औषधोपचार मोफत उपलब्ध दिले आहे व इतर सुविधा दिलेल्या आहेत. तसेच निक्षय पोषण योजनेंतर्गत उपचार संपेपर्यंत दरमहा मानधन व फूडचे वाटपही केले जाते.