

गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावखेड्यातील मुली शिक्षणासाठी गेवराई शहरात येतात.परंतु या मुलींची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. शाळा व महाविद्यालयाच्या सभोवताली रोडरोमिओंचा उच्छाद वाढल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातून अनेक मुली गेवराईतील शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. शहरातील शाळा, महाविद्यालये सुटल्यानंतर रोडरोमिओंचा वावर शाळा, महाविद्यालयाच्या सभोवताली दिसून येतो. शाळा, महाविद्यालये परिसरात मोठ्या प्रमाणात रोडरोमिओंचा वावर वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.