गेवराई : जातेगाव (जि.बीड) मागील वीस दिवसांपासून आळंदी ते पंढरपूर पायी वारीत सहभागी झालेल्या जातेगाव (ता गेवराई) येथील वारकरी महिलेचा आज (दि.१७) सकाळी पंढरपूरात हृदयविकाराने मृत्यू झाला. द्वारका रामराव चव्हाण (वय ६९) रा.जातेगाव ता. गेवराई असे वारकरी महिलेचे नाव आहे.
द्वारका चव्हाण या गावातील विनायक महाराज मरकड यांच्या दिंडीत सहभागी होत्या. मागील २० दिवस आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत त्या बुधवारी (दि.१७) पहाटे पंढरपुरात आल्या. त्यानंतर चंद्रभागेत आंघोळ करुन त्यांनी पांडुरंगाला प्रदक्षिणा घातली. पंढरपुरातील लाखो वारक-यांचा आनंदमय (भक्तीमय) सोहळा पाहून या वारकरी महिलेचा विठ्ठल मंदिराच्या पायरी हृदयविकाराने मृत्यू झाला. या वारकरी महिलेच्या आकस्मित मृत्यूमुळे चव्हाण कुटुंबियांना धक्का बसला आहे.