किनगाव परिसरातील दोन मुले बेपत्ता; नागरिकांत घबराटीचे वातावरण | पुढारी

किनगाव परिसरातील दोन मुले बेपत्ता; नागरिकांत घबराटीचे वातावरण

किनगाव ; पुढारी वृत्‍तसेवा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील दोन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. त्‍यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेपत्ता की अपहरण याबाबत उलट सुलट चर्चा नागरिकांत पाहायला मिळत आहे.

गोढाळा येथील आदित्य काशिनाथ नागरगोजे (वय १५ वर्ष) हा मुलगा १६ जून रोजी सकाळी ६ वाजता मोळवण वरून किनगाव येथे आला. त्यापुढे कुठे गेला काहीच पत्ता लागला नाही. दुसरा मुलगा लक्ष्मण उर्फ कृष्णा प्रल्हाद घुले (वय २३ वर्ष) रा. हिंगणगाव हाही बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. सलग दोन दिवस मुले बेपत्ता झाल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही मुलांच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी नातेवाईक व मित्र मंडळींकडे याबाबत चौकशी केली जात आहे. पुढील तपास किनगाव पोलीस करीत आहेत. लवकरात लवकर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी नातेवाईक करीत आहेत.

दोन्ही मुलांचे तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. लवकरात लवकर मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भाऊसाहेब खंदारे
सपोनि पोलीस ठाणे किनगाव

Back to top button