
राज्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोकणातील अनेक भागांत गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून रेल्वे, महामार्ग आणि शहरांतील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.