म्हाकवे; पुढारी वृत्तसेवा : भोपाळ (मध्य प्रदेश) येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या स्पर्धेत आणूर (ता.कागल) येथील तृप्ती आप्पासो गुरव हिने ४६ किलो वजन गटात ब्राँझ पदक पटकाविले. तिच्या दिल्ली, हरियाणा, सांगली येथील मल्लांशी लढती झाल्या.
आणूर येथील पहिल्याच महिला कुस्तीपट्टू बनलेल्या तृप्ती हिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ती सध्या गोखले महाविद्यालयात ११वीच्या वर्गात शिकत आहे. तिने दोनवेळा शालेय स्पर्धेत राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. तिला वस्ताद शिवाजीराव जमनिक (बानगे) व कुस्तीकोच संदीप पाटील दोनवडे (ता.करवीर) यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा :