चाकरमान्यांना 'टोल फ्री'चा अध्यादेश, मात्र टोल नाक्यावर अंमलबजावणीच नाही

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून अजूनही आला नाही आदेश
toll free order news
चाकरमान्यांच्या वाहनांना शासनाने 'टोल माफी' जाहीर केली आहे.
Published on
Updated on
राजकुमार बा. चौगुले

किणी : यंदाही गणपती सणासाठी पुण्या-मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'टोल माफी' जाहीर केली. त्याचा अध्यादेश निघून चोवीस तास उलटले, तरी अद्यापही टोल नाका प्रशासनास तशी कोणतीही सूचना मिळाली नसल्याने नाक्यावर वादाचे प्रसंग घडत आहेत.

toll free order news
गणेशोत्सवात महामार्गावर 'टोल फ्री' ची घोषणा : प्रशासन आदेशाच्या प्रतीक्षेत

गणेश चतुर्थीला गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावर होणारा उशीर व प्रवास करणे धोकादायक आणि अवघड बनले आहे. मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेने गेले तर भरमसाट भरावा लागणारा टोल यामुळे खास गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणार्‍या भक्तांना गणेशोत्सव काळात गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ५ ते १९ सप्टेंबर या काळात टोलमाफी देण्याची घोषणा केली आहे. कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणार्‍या गणेशभक्तांच्या कार ,जीप यांसारख्या वाहनांना जाताना व गणेश विसर्जनानंतर परतणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत एसटी बसेसना ही लागू केली आहे.

मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग(राम क्र.४८), मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग(क्र.६६) तसेच इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना सवलत देण्यात येत असल्याचा अध्यादेश बुधवारी (दि.४) काढण्यात आला. याकरिता 'गणेशोस्तव २०२४, कोकण दर्शन' असे स्टिकर जवळच्या पोलीस ठाण्यातून, चौकीतून किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयातून घेणे आवश्यक करण्यात आले आहे. यापूर्वी टोल सवलतीचा हा कालावधी गणेशोत्सवापूर्वी जाताना तीन दिवस आणि गणेशोत्सवानंतर तीन दिवस असा सुमारे पंधरा दिवसांच्या कालावधीत लागू केल्याची घोषणा करण्यात आली होती. याचा लाभ हजारो वाहनधारकांनी घेतला होता.

पुण्याहून निघाल्यानंतर चिपळूणकडे जाणारी वाहने कराडपासून पाटणमार्गे रत्नागिरी, राजापूरला जाणारी वाहने किणी -वाठार वारणानगर- कोडोली मार्गे आंबा घाटातून. देवगड, कणकवलीस जाणारी वाहने कोल्हापूर, गगनबावडा मार्गे करूळ घाटातून तर कुडाळ मालवण सावंतवाडी, गोव्यास व कर्नाटकात जाणारी वाहने आजरा आंबोली मार्गे जात होती. यावर्षीही टोल फ्री सवलतीच्या काळात किणी(जि. कोल्हापूर) व तासवडे (जि. सातारा) यासह महामार्गावरील टोल नाक्यावरून सुमारे दहा हजाराहून अधिक पासधारक वाहने मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. मात्र गणेशभक्त आपापल्या गावी पोहोचले तरी अजूनही टोल फ्री संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे कोणताही आदेश आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

फास्टॅगचे काय ?

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जवळपास ९९ टक्के वाहनांना फास्टॅग आहेत. त्यामुळे टोल फ्रीचे स्टिकर वाहनाला लावूनही टोल नाक्यांवर वाहन आल्यानंतर ऍक्टिव्ह फास्टॅग असणाऱ्या वाहनाच्या टोलची रक्कम त्याच्या खात्यातून वसुल होत असते. यामुळे वाहनधारकाला फास्टॅग डीऍक्टिव्ह करायला पाहिजे किंवा काचेवर लावलेला फास्टॅग काढुन टाकला पाहिजे, असे नसेल तर अशा वाहनांची नोंद ठेवून त्यांची जमा झालेली रक्कम त्या वाहनधारकाला परत करण्याची व्यवस्था केली पाहिजे.

महामार्गावरील टोल नाक्यांवर गणेशभक्तांना टोल सवलत देण्याबाबत शासनाचा अध्यादेश निघाला असला, तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयातून अद्याप कोणतीही सूचना मिळाली नाही. ही सूचना मिळताच गणेश भक्तांना 'टोल फ्री' सुविधा देण्याबाबतची सूचना टोल नाका प्रशासनास देण्यात येईल
वसंत पंदरकर , प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
toll free order news
गणेशोत्सवात चाकरमान्यांना महामार्ग ‘टोल फ्री’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news