अलमट्टी उंचीविरोधात 1 मे ला ग्रामसभेत ठराव करा, केंद्राला पाठवा : राजू शेट्टी

pass-resolution-against-almatti-height-in-gramsabha-on-may-1-says-raju-shetti
राजू शेट्टीPudhari File Photo
Published on
Updated on

जयसिंगपूर : कर्नाटक राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या बाधीत लोकांना मोबदला देऊन त्यांना स्थलांतरीत करण्यात येत असून याला तीव्र विरोध करण्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित गावातील ग्रामपंचायतींनी 1 मे च्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधातील ठराव करून सदरचे ठराव पंतप्रधान कार्यालयास पाठविण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केले आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढविल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, औद्योगीक व साखर कारखानदारीला सर्वात मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून याबाबत दुर्लक्ष केले जात असून केंद्र सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा न केल्याने याचा फटका सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला बसणार असल्याचे शेट्टी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news