सैनिक टाकळी -मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी जरांगे-पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आपल्या मुलांना, शेतकऱ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ही शेवटची संधी आहे. ज्या ठिकाणी रॅली होणार आहे. त्या ठिकाणी काम बंद करून मराठा समाजाने आपल्या मुलांसाठी एकत्र यावे, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले होते. त्या आव्हानाला समर्थन म्हणून सैनिक टाकळीतील असंख्य तरुण आज कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.
मनोज जरांगे-पाटील हे कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती स्तंभ मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ‘शांतता रॅली’ काढणार आहेत. शांतता रॅली नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.
सकल मराठा समाजाच्यां वतीने कोल्हापूर येथे आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी आज शिरोळ तालुक्यातून सकल मराठा समाज उपस्थित राहू शकतो. त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.