राशिवडे ; पुढारी वृतसेवा जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या मतदानास आज (रविवार) सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ५८ गावांमधील ८२ मतदान केंद्रावर हे मतदान होत आहे. सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती. शेतीकामासाठी जाणाऱ्या सभासदांनी सकाळीच मतदान करुन शेताकडे जाणे पसंद केले.
८२ मतदानकेंद्रावर ७२० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राशिवडे बु, ठिकपुर्ली, कौलव, सडोली, परिते आदी मतदानाची संख्या जास्त असणाऱ्या गावांवरच सर्व नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे. तिन्ही पॅनल, आघाडींमध्ये पै पाहुणे, नातलगांचा भरणा असल्याने फुटीर मतदानाची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा :