कोल्‍हापूरकरांचं टेन्शन वाढलं : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

८१ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत
Kolhapur Rain : Panchganga River is moving towards danger level
Kolhapur Rain : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचालPudhari Photo

कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा

शहर आणि जिल्‍ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्‍टी सुरू आहे. त्‍यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. तसेच धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ होत असून, अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्‍यातच पंचगंगा नदीची धोक्‍याच्या पातळीकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.(Kolhapur Rain)

जिल्‍ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरूच आहे. त्‍यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे 8 राज्य मार्ग आणि 20 प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत.(Kolhapur Rain)

पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज

संभाव्य पुरस्‍थितीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नदी किणाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. तसेच आपत्‍कालिन प्रसंगाला तोंड देण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन केले आहे.(Kolhapur Rain)

पंचगंगा नदीची धोका पातळी कडे वाटचाल सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 11 इंचावर पोहचली आहे. धोका पातळी 43 फूट आहे. मुसळधार पावसामुळे 81 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे.(Kolhapur Rain)

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 8 राज्य मार्ग आणि 20 प्रमुख जिल्हा मार्ग पाण्याखाली गेले आहेत. पर्यांयी मार्गानी वाहतुक सुरू आहे. आजही भारतीय हवामान खात्याने कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण हे 90 टक्के भरलं आहे.(Kolhapur Rain)

जिल्ह्यातील सर्वच नद्या या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने नदीकाठी चिंता वाढली असून, त्यांचे स्थलांतर सुरू झालं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील 157 कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर 20 मार्गावरील एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, तसेच पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.(Kolhapur Rain)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news