Kolhapur News | जय शिवराय किसान संघटनेने वारणेची ऊस वाहतूक रोखली

ऊसाचा दर जाहीर करा मगच कारखाना सुरु करा| परवानगी न घेता कारखाना सुरु केल्याने कायद्याचा भंग झाल्याचा आरोप
Kolhapur News
तळसंदे: येथे जय शिवराय किसान संघटनेने रोखलेली ऊस वाहतूकPudhari Photo
Published on
Updated on

कासारवाडी : मागील हंगामातील उसाचा हिशोब कायद्यानुसार देणे बंधनकारक असताना व अद्यापही काही कारखान्यांनी दिलेला नाही. तसेच शुगर केन ऍक्ट १९६६ नुसार हंगाम सुरू करण्यापूर्वी स्थानिकच्या दोन वर्तमानपत्रातून उसाचा दर किती देणार हे जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे. असे असताना वारणा कारखान्याने हंगाम सुरू केल्याने जय शिवराय किसान संघटनेने काही काळ ऊस वाहतूक रोखली होती.

Kolhapur News
कोल्हापूर : दत्तवाड येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

एक नोव्हेंबर २०२५ पासून तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना सुरू केलेला आहे. परवानगी न घेता साखर कारखाना सुरू केल्यामुळे त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. वारणेची ऊस वाहतूक रोखल्यानंतर कारखान्याचे शेती अधिकारी प्रमोद पाटील यांनी सर्व आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी यावर्षीच्या गळीत हंगामाचा ऊस दर जाहीर करूनच व पाठीमागचा हिशोब देऊनच साखर कारखाना चालू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली.

Kolhapur News
कोल्हापूर : संताजी घोरपडे कारखान्याची ऊस वाहतूक बेलेवाडी काळम्मा येथे रोखली

यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, स्वाभिमानी शेतमजूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, गब्बर पाटील, शिवाजी आंबेकर, सागर माळी, पांडुरंग इंगळे, तानाजी तेली, बबन माने, विजय पाटील, माणिक पाटील, नामदेव पाटील, कृष्णात पाटील, नानासो इंगळे, उत्तम पाटील, रमेश गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news