सैनिक टाकळी : पुढारी वृत्तसेवा
अकिवाट गावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रॅक्टर मधून जात असताना महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटल्याने दुर्घटना घडुन त्यामध्ये अकिवाट गावचे सरपंच पती सुहास पाटील यांना आपला जीव गमवावा लागला. जिल्हा परिषद माजी सदस्य इकबाल बैरागदार आणि माजी सरपंच अण्णासो हसुरे हे बेपत्ता आहेत. याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
दुर्घटनेत ज्यांचा जीव वाचला आहे, त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहेत. एक सांगली सिव्हिल हॉस्पिटल तर दुसरा कोल्हापूर सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर मृत सुहास पाटील यांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देऊ असे यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले.