![इब्राहिमवाडी मात्र तहानलेली](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2Fradhanagri.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गुडाळ ; आशिष ल. पाटील नजरेसमोर अथांग पसरलेला राधानगरी जलाशय आणि जलाशयाच्या काठावरील इब्राहिमवाडी मात्र पाण्या वाचून तहानलेली! अतिशय विरोधाभास असलेले हे वास्तव आहे. राधानगरी जलाशयाच्या काठावर फेजिवडे पैकी इब्राहिमवाडी वसलेली आहे.
राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून विस्थापित झालेली मुस्लिम समाजातील काही कुटुंबे जलाशयाच्याच काठावर राधानगरी धरणापासून जवळच असलेल्या इब्राहिमवाडीत राहत आहेत. शंभरहून अधिक लोकवस्ती असलेल्या या वाडीला बोअरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मात्र मार्च पासून जून पर्यंत बोअरचे पाणी कमी-कमी झाल्यानंतर ग्रामस्थांचे पाण्यावाचून खूप हाल होतात. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात इब्राहिम वाडीत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते.
डोळ्यासमोर राधानगरी जलाशयाचे अथांग पाणी असते, मात्र वाडीत पाणी उपलब्ध नसते. ग्रामस्थांना विशेषता महिलांना कसरत करत चारशे -पाचशे मीटर अंतरावरील जलाशयातून चढण चढत पाणी डोईवरून घागरी भरून आणावे लागते.
जिल्हा परीशदेचे माजी सभापती अभिजीत तायशेटे यांच्या प्रयत्नातून सौर ऊर्जेद्वारा जलाशयातून थेट पाणी उपसा करून इब्राहिम वाढीसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्रस्तावित आहे. या प्रस्तावासाठी त्वरित निधी मंजूर व्हावा आणि पुढच्या उन्हाळ्यात तरी आम्हाला नळाद्वारे पाणी मिळावे अशी ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे.
हेही वाचा :