India Pakistan Tension : 'पाकड्यांना अद्दल घडवण्यासाठी अर्ध्या रात्री बोलवा... आम्ही बिस्तारा बांधून ठेवलाय'

गरज पडल्‍यास सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मॅुंह तोड जवाब देंगे माजी सैनिकांची जोशभरी भावना
India Pakistan Tension
India Pakistan Tension : 'पाकड्यांना अद्दल घडवण्यासाठी अर्ध्या रात्री बोलवा... आम्ही बिस्तारा बांधून ठेवलाय'File Photo
Published on
Updated on

Former soldiers of Sainik Takli congratulate Indian soldiers for Operation Sindoor

सैनिक टाकळी : पुढारी वृत्तसेवा

सैनिकांचं गाव अशी ओळख असलेल्या सैनिक टाकळीतील माजी सैनिकांनी भारतीय सैनिकांचं अभिनंदन करत गरज पडल्यास सीमेवर जाऊन भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मॅुंह तोड जवाब देंगे, अशी जोशभरी भावना व्यक्त केली आहे.

India Pakistan Tension
India Pakistan Tension : चंदीगडमध्ये हवाई हल्‍ल्‍याचा इशारा देणारे सायरन वाजू लागले... लोकांना घरातच राहण्याच्या सूचना

भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थिती कायम आहे. त्यामुळे युद्धासाठी 'आम्हालाही बोलवा', अशी विनंती सैनिक टाकळी येथील निवृत्त सैनिकांनी केली आहे. सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या बद्दल जिवाला फार बरे वाटले अशा प्रतिक्रिया देऊन माजी सैनिकांनी या धाडसी कारवाईचं स्वागत केलं आहे.

यापेक्षा आक्रमक धोरण राबवून भारतानं पाकिस्तानला नेस्तनाबूत करावं. वारंवार भारतीय हद्दीत दहशतवादी पाठवून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे अशी भावना व्यक्त केल्या. भारतीय सैन्य दलात सहभागी झालेले निवृत्त सैनिक हवालदार जनार्दन पाटील, हवालदार दादासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते.

India Pakistan Tension
India-Pakistan War : पेट्रोल-डिझेलबाबत 'पॅनिक' होवू नका! देशभरात भरपूर इंधन साठा : इंडियन ऑइलची स्‍पष्‍टोक्‍ती

सक्षमपणे भारतीय सैन्यातील हवाई दल, नौदल आणि भूदलाच्या मागे सक्षमपणे निवृत्त सैनिकांची फळी खंबीरपणे उभी आहे. यामुळं सैनिकांनी पुरी जी जॉन से लढावं आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करावं अशी प्रतिक्रिया निवृत्त सैनिक सुभेदार मेजर आत्माराम पाटील यांनी दिली आहे.

India Pakistan Tension
Operation Sindoor | भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू झाले का? त्याची औपचारिक घोषणा कोण करते?

मॅुंह तोड जवाब देण्यासाठी निवृत्त जवान सज्ज

कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे. कारगिल युद्धाच्या वेळी परिस्थिती वेगळी होती. सध्या या स्थितीवर मात करून भारतीय सैन्य दलानं देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करुन पाकिस्तानला धूळ चारली आहे. म्हणून भारतीय सैन्याला नागरिकांचा मोठा पाठिंबा आहेच. पण हवाई हल्ल्यानंतरही पाकिस्तान शांत राहीला नाही, तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तान नाव नष्ट करू. यापूर्वीही तीनदा पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. यापुढंही भारताकडून मॅुंह तोड जवॉब मिळेल. अर्ध्या रात्री आम्हाला बोलवा. आम्ही बिस्तारा बांधून ठेवलाय.
कॅप्टन प्रकाश खोत निवृत्त सैनिक, सैनिक टाकळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news