राशिवडे : पुढारी वृत्तसेवा
लग्नानंतर नववधुसह सोबत असणार्या दोन सहकार्यांनी नवऱ्याची सुमारे सोन्याच्या दागीण्यासह ४ लाख १६ हजारांची फसवणूक केली. या विषयीची तक्रार नवरदेवाचा भाऊ पांडुरंग गजानन बाबर बारडवाडी राधानगरी यांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये दिली. यानंतर पो.नि.संतोष गोरे, उपनिरिक्षक खंडू गायकवाड यांनी नववधुसह दोन आरोपींना अटक केली.
याबाबत मिळालेली महिती अशी की, फिर्यादी पांडुरंग बारड यांचे भाऊ रमेश बारड यांचा विवाह राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ मोहोळ जिल्हा सोलापूर यांच्याशी दि.२६/४/२४ रोजी करण्यात आला. यावेळी सुवर्णा अमोल बागल, अमोल शहाजी बागल रा. जवाहरनगर नाईकवाडी वस्ती मोहोळ जि.सोलापूर हे उपस्थित होते. लग्नानंतर दि.२७/४/२४ नंतर नवरी घरातून पळून गेली. यावेळी लग्नासाठी दिलेल्या स्त्रिधनासह सोन्याचे गंटन, टाॅप, नेकलेस, मणी मंगळसूत्र, चांदीचे पैजण, साड्या यासह आदी वस्तू किंमत सुमारे ४ लाख १६ हजारांच्या वस्तू घेऊन पलायन केले.
फसवणुक झाल्याने नवऱ्याचा भाऊ पांडुरंग बारड याने राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार केली. यानंतर पोलिस उपनिरिक्षक खंडु गायकवाड यांनी यातील नववधुसह दोन आरोपींना अटक केली. या टोळक्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.