कोल्हापूर : त्र्यंबोलीच्या भेटीसाठी श्री अंबाबाई गजारुढ रुपात सजली | पुढारी

कोल्हापूर : त्र्यंबोलीच्या भेटीसाठी श्री अंबाबाई गजारुढ रुपात सजली

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : आज अश्विन शुद्ध पंचमी आजचा दिवस कोल्हापूरकरांसाठी त्र्यंबोली पंचमी म्हणून ओळखला जातो. अंबाबाईने याच दिवशी कोल्हासूराचा वध केला. त्यावेळी तिने वर दिला की, दरवर्षी मी तुझ्या नावाने कोहळा बळी देईन आणि या नगराला तुझे नाव असेल.

पुढे कामाक्ष नावाच्या कोल्हासुराच्या नातवाने कपिल मुनींकडून योगदंड मिळविला. त्याच्या प्रभावाने त्याने अंबाबाईसह सर्व देवांचे रूपांतर बक-यांमध्ये केले. हे कळताच त्र्यंबोलीने कामाक्ष कोल्हासुराचा वध केला आणि सर्व देवांची सुटका केली. पण ते त्र्यंबोलीचे आभार मानायचे विसरून गेले. त्यामुळे त्र्यंबोली रागाने शहराबाहेर टेकडीवर जाऊन बसली. तिची समजूत घालायला स्वतः महालक्ष्मी तिथे गेली व आज देखील या भेटीचा सोहळा होतो. या भेटीसाठी कोल्हापूरची श्री अंबाबाई आज गजारूढ रूपात सजली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button