रेठरेत विजेची तार शेतात पडून १५ एकरातील ऊस जळून खाक

शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान
15 acres of sugarcane burnt after electric wire falls on field in Rethre
रेठरेत विजेची तार शेतात पडून १५ एकरातील ऊस जळून खाकFile Photo
Published on
Updated on

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा

वारणा रेठरे ता. शाहूवाडी येथे प्रवाहित विजेची तार ऊसाच्या शेतात पडल्याने सुमारे पंधरा एकर ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रेठरे वारणा नदीकाठावर हे ऊसाचे क्षेत्र आहे. उच्च प्रवाहाची विजेची तार ऊसाच्या शेतात पडली आणि ही आग लागली.

या आगीत गावातील विकास पाटील, कॄष्णात पाटील, आनंदा पाटील, जालिंदर पाटील, भगवान पाटील, रंगराव पाटील, अशोक पाटील, राजाराम पाटील, महादेव पाटील, बाळू पाटील, या शेतकऱ्यांच्या मालकीचे हे उसाचे श्रेत्र आहे. या आगीत या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news