कोल्हापूर : तंबाखूसाठी चुना मागण्याच्या कारणावरून राधानगरीतील धामोडमध्ये खून
धामोड; पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तंबाखू खाण्यासाठी चुना मागण्यावरून विकास नाथाजी कुंभार आणि जितेंद्र केरबा खामकर या दोघांची बुरंबाळी येथील हॉटेलमध्ये वादावादी झाली. यातून एकाचा खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या धामोड येथे घडली.
हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने मामा अनिल रामचंद्र बारड याला बोलावून घेतले. व रात्री ११ वाजता ते दोघेजण कुंभारवाडी (ता. राधानगरी) येथे गेले. आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकुने अनिल बारड यांच्यावर दोन वार केले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.
कोल्हापूर : जापनीज कमांडोंनी जाणून घेतला शिवछत्रपतींचा ‘गनिमी कावा’! https://t.co/3zUIPcsFTVकोल्हापूर-जापनीज-कमांडोंनी-जाणून-घेतला-शिवछत्रपतींचा-गनिमी-कावा/ar #pudharinews #pudharionline #Kolhapur #NewPalaceKolhapur @YuvrajSambhaji
— Pudhari (@pudharionline) March 12, 2022
मारेकरी विकास कुंभार याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून आधिक तपास पोलीस निरीक्षक एस एस कोळी व पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह कोळी हे करत आहेत. अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणून काम करत होते. दरम्यान धामोड येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आठवडी बाजार बंद करण्यात आल्याचे धामोड प्रशासनाने घेतला आहे.