Narayan Rane : वैभववाडी - कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी निधीचा प्रश्न!

खा. नारायण राणे यांची माहिती; पाठपुरावा सुरू
Narayan Rane
Narayan Rane
Published on
Updated on

कणकवली ः वैभववाडी - कोल्हापूर रेल्वेमार्गाचा सर्व्हे झाला आहे. फक्त निधीचा प्रश्न आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही. त्यामुळे ते थांबले आहे. जर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन आर्थिक तरतूद केली तर ते मार्गी लागेल. मात्र ते होईल, या रेल्वे मार्गाची आपली अग्रक्रमाने मागणी असल्याचे खा. नारायण राणे यांनी सांगितले.

वैभववाडी - कोल्हापूर रेल्वेमार्ग गेल्या अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे. या मार्गाचा सर्व्हेदेखील झाला आहे. मात्र आर्थिक तरतुदीअभावी हे काम रखडले आहे. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार उदिमाला अधिक चालना मिळणार आहे. शिवाय बंदर विकासालाही बळ मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग होण्यासाठी खा. नारायण राण्ो यांचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत खा. नारायण राणे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी आर्थिक तरतुदीच्या अभावी हे काम तूर्तास थांबल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news