

वैभववाडी : भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने उच्छाद घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी सकाळी 5 जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सोमवारी सकाळी जयवंती दत्ताराम पांचाळ (रा.ऐणारी), रघुनाथ भिकाजी मोहिते (रा.ऐणारी), संतोष बापू शेळके (रा.भुईबावडा), राजेंद्र रमेश पाथरे (रा.तिरवडे), परशुराम राठोड (रा.भुईबावडा) या पाच जणांचा कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. यातील दोन वयोवृद्ध आहेत. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून भटक्या कुत्र्यामुळे रस्त्यात कुत्री आडवी येऊन अनेक मोटार सायकलस्वार पडून जखमी झाले आहेत. तसेच पाळीव प्राण्यांना सुद्धा या भटक्या कुत्र्यांकडून त्रास दिला जात आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी केले जात आहे.