

सावंतवाडी : मडुरा, सातोसे आणि कास परिसरातील शेतकर्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या ‘ओंकार’ हत्तीला पकडण्यासाठी वन विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. यासाठी वनविभागाने विशेष ‘वॉर रूम’ तयार केला असून पुढील आठ दिवसांत हत्तीला पकडण्यात येईल, असे ठोस आश्वासन जिल्हा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी ग्रामस्थांना दिले.
शेतकर्यांचे शिष्टमंडळ वन विभागात मडुरा, सातोसे आणि कास या गावांमध्ये रात्रीच्या वेळी ‘ओंकार’ हत्तीचा वावर प्रचंड वाढला आहे. या हत्तीने शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ग्रामस्थांच्या या गंभीर तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कारवाई व्हावी, यासाठी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमूख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने उपवनसंरक्षक श्री. शर्मा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
बाळू गावडे, सोमनाथ परब, दिलीप परब, नारायण परब, ज्ञानेश्वर परब, मनोहर परब, संतोष जाधव, प्रशांत परब, प्रशांत साटेलकर , परीक्षित मांजरेकर आदींसह ग्रामस्थ, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी संजू परब आणि ग्रामस्थांना सांगितले की, ‘ओंकार’ हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम एका ‘वॉर रूम’ प्लॅननुसार युद्धपातळीवर सुरू असून, पुढीलआठ दिवसांत हत्तीला पकडण्यात निश्चितपणे यश येईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
आठ दिवसांत हत्तीला पकडणार; उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची ग्वाही नुकसानीचे पंचनामे व मदतीचे आश्वासन ‘ओंकार’ हत्तींकडून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत उपवनसंरक्षक श्री. शर्मा म्हणाले, नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाच्या निकषानुसार उपलब्ध मदत त्वरित देण्यात येईल.