मालवण : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यामुळे त्या दुर्घटनेनंतर राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या नावाला साजेसे असे शिवस्मारक उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यासाठी राजकोटच्या आजूबाजूच्या जमिनी मालक देण्यास तयार आहेत. ज्या पद्धतीने नर्मदा नदी किनारी वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. तो विचार करून हे स्मारक उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकोट येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पुतळा कोसळण्याच्या दुर्घटना घडण्यास जे दोषी आहेत ते पळून- पळून कुठे पळणार, असा सवाल करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी राजकोट किल्ल्यावरील राजकोट तटबंदीच्या कामाबाबतही उपमुख्यमंत्री नाराज पुतळ्याचे बांधकाम नौदलाने केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्घटना घडल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले आहे.
पुतळ्याच्या आजूबाजूचे सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्याचे स्पष्टीकरण बांधकाम अधिकाऱ्यांनी दिले होते. शुक्रवारी राजकोट पुतळ्याच्या दुर्घटनेची पाहणी करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष राजकोट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाऊन बांधकामाची पाहणी केली, तर तटबंदीला पडलेल्या भेगा पाहून दादांनी कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त केला.