Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी; हवामान खात्याचा 'यलो अलर्ट', बळीराजा सुखावला

Ratnagiri Rain News
Ratnagiri Rain NewsCanva
Published on
Updated on

रत्नागिरी : हवामान खात्याने आज रत्नागिरी जिल्ह्याला 'यलो अलर्ट'चा इशारा दिला असतानाच, दक्षिण रत्नागिरीत सकाळपासून दाटून आलेल्या ढगांनी दुपारनंतर जोरदार वृष्टीला सुरुवात केली. विशेषतः लांजा तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी, बस स्थानक आणि बाजारपेठ परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम दिसून आला.

शहरी भागात धांदल, ग्रामीण भागात समाधान

दुपारनंतर पावसाचा जोर अचानक वाढल्याने लांजा शहरात रस्त्यांवरील वाहतूक काहीशी मंदावली. अचानक आलेल्या जोरदार सरींमुळे ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांना आडोसा शोधावा लागला, तर काहींनी छत्र्या, रेनकोटच्या मदतीने आपली कामे सुरू ठेवली.

समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला

दुसरीकडे, या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पेरणीची कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली असून, आता पिकांना पाण्याची नितांत गरज होती. या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला असून, चांगल्या पिकाची अपेक्षा व्यक्त होत आहे. सकाळपासूनच्या ढगाळ वातावरणानंतर आलेल्या या पावसाने उकाड्यापासूनही काहीसा दिलासा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news