

देवरुख : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत झालेला आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता सिद्ध झाल्यानंतर कोकण विभागीय आयुक्तांनी कळंबुशीचे सरपंच सचिन शांताराम चव्हाण यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९(१) अन्वये २५ ऑगस्ट रोजी हा आदेश जारी करण्यात आला.
'शेवट करंडा' पाखाडीचे काम न करताच ८५,००४ रुपये लाटले. पुरावे व मूल्यांकनाशिवाय बिले अदा करून १,१६,६८१ रुपयांचा संशयित अपहार; एकूण १,९७,४५४ रुपयांचा थेट अपहार उघड, ६०० पैकी १२८ कचराकुंड्या आणि ५८ पैकी ३८ खुर्च्या गायब; साठा नोंदवहीत कोणतीही नोंद नाही.