रत्नागिरी,पुढारी वृत्तसेवा :रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने कोल्हापूर आणि रत्नागिरी घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्शभुमीवर सोमवारी (दि.8) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, बऱ्याच ठिकाणी पुलावरुन पाणी वहात आहे. काही ठिकाणी गावांमधील भागात पाणी आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये तसेच पूर्व दक्षता म्हणून उद्या सोमवारी प्राथमिक, माध्यमिक शाळांना तसेच महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासानाकडून घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात रविवारी उशिरा जिल्हा प्रशासनाने आदेश काढले.