Konkan Railway : गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडणार

खा. नारायण राणे यांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन
Konkan Railway
गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडणार
Published on
Updated on

रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी- सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आगामी गणेश चतुर्थीसाठी गतवर्षीपेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांसाठी गतवर्षीपेक्षा जास्त गाड्या सोडण्याचे आश्वासन दिले आहे.

याबाबतचे पत्र खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले होते तसेच त्यांची दिल्ली येथे भेट घेऊन कोकणवासीयांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न प्रत्यक्षात मांडला. गणेशोत्सवाचे कोकणवासीयांसाठी मोठे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविक, विशेषतः मुंबई आणि पुणे येथून, आपल्या मूळ गावी उत्सवासाठी प्रवास करतात. या काळात प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ होते, ज्यामुळे गर्दी वाढते आणि रेल्वे आरक्षण मिळवणे कठीण होते.

गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने गणेशोत्सवासाठी 342 विशेष गाड्या चालवून चांगला प्रतिसाद दिला होता. यावर्षी भाविकांचा प्रवास अनुभव आणखी सुधारण्यासाठी खासदार राणे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांना चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि कोकण रेल्वे मार्गावरील इतर महत्त्वाच्या स्थानकांशी जोडणार्‍या विशेष रेल्वे सेवांची संख्या वाढवावी. प्रवाशांना प्रवासाची योजना आगाऊ करता यावी आणि शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळता यावी यासाठी या विशेष गाड्यांची वेळेवर घोषणा आणि आरक्षण सुरू करणे सुनिश्चित करावे, असे नमूद केले होते. या बैठकीदरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी कोणताही त्रास होणार नाही याची याची ग्वाही दिली. तसेच, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा प्रस्ताव लवकर सादर करण्याचे आदेशही रेल्वे प्रशासनाला दिले.

खा. नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संगमेश्वर रोड स्टेशनवर गाड्यांना थांबा देण्याचीही मागणी पत्राद्वारे केली होती. या संदर्भात आता कोकण रेल्वेने 10 जुलै 2025 रोजी रेल्वे बोर्डाला दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे की, 19577/19578 जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस आणि 20910/20909 पोरबंदर-तिरुवनंतपुरम एक्सप्रेसचा संगमेश्वर रोड स्टेशनवर थांबा देणे करणे शक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news