Sindhudurg News: शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट : ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन | पुढारी

Sindhudurg News: शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट : ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदन

मालवण : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज (दि.१९) मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास ठाकरे गट व शिवप्रेमी यांच्यातर्फे मालवण तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. Sindhudurg News

याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांना सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, यशवंत गावकर, उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर, प्रसाद चव्हाण, सचिन गिरकर, चिंतामणी मयेकर, हेमंत मोंडकर आदी उपस्थित होते. Sindhudurg News

मालवण शहरातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. पुतळ्याच्या सभोवताली बांधण्यात आलेली तटबंदी, चौथरा ढासळत चालली आहे. त्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करणे म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान केला सारखा आहे. केवळ पैसे कमावण्यासाठी संबंधितानी हे काम केले असेल तर ते चुकीचे आहे, तटबंदी साठी वापरण्यात आलेला चिरा देखील कमी दर्जाचा असून बांधकामातील प्रक्रियेनुसार दगडांची सांगड न घालताच तटबंदी उभारण्यात आली आहे. त्यामुळे तटबंदीचे दगड ढासळत आहेत, असे यावेळी हरी खोबरेकर व पदाधिकाऱ्यांनी सांगत या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

हेही वाचा 

Back to top button