Maharashtra Assembly Polls | ८७ मतदारसंघांवर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष

भरारी पथके नेमण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना निर्देश
Election Commission of India
८७ मतदारसंघांवर निवडणूक आयोगाचे विशेष लक्षfile photo
Published on
Updated on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत प्रचंड खर्च आणि गैरव्यवहार यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रडारवर आलेले ८७ मतदारसंघ आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. या मतदारसंघांतील खर्चावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असणार आहे.

या मतदारसंघांमध्ये सध्या तैनात करण्यात आलेल्या पथकांव्यतिरिक्त आणखी भरारी पथके नेमण्याचे निर्देश संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या पथकांमध्ये राज्याच्या पोलीस विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे अधिकारी किंवा कर्मचारी नेमावेत, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील ८७ विधानसभा क्षेत्रामध्ये आचारसंहितेच्या काळात जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू मोठ्या प्रमाणात आढळून आल्या होत्या. तसेच उमेदवारांच्या खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने हे मतदारसंघ संवेद- नशील म्हणून घोषित केले आहेत.

खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ

Maharashtra Assembly Polls
खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील मतदारसंघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news