नगर : पुढारी वृत्तसेवा :मागासवर्गीय विकास महामंडळ व बँकांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष नरेश चव्हाण, संदीप पवार उपस्थित होते.
गेल्या 15 वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, आर्थिक मंदी, कोविड महामारी या कारणाने मागासवर्गीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे मागासवर्गीय महामंडळ, बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे शक्य होत नसल्याचे निवेदनात म्हटले.
दरम्यान, भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीवर आता काय निर्णय होणार, याकडे लक्ष आहे.
हेही वाचा