संगमनेर : घारगावला दिंडीत कंटेनर घुसला, ३ वारकरी ठार तर ९ जखमी

संगमनेर : घारगावला दिंडीत कंटेनर घुसला, ३ वारकरी ठार तर ९ जखमी
Published on
Updated on

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी येथून आळंदीला निघालेल्या दिंडीमध्ये भरघाव वेगाने आलेला कंटेनर घुसल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ३ वारकरी ठार तर ९ वारकरी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी सायंकाळी ही घटना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव जवळील १९ मैल या ठिकाणी सुमारास घडली.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने शिर्डी येथून साई नामाचा गजर करत आळंदीकडे दिंडी निघालेली होती. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास नांदूर खंदरमाळ फाट्याजवळील १९ मैलावर या दिंडीत भरधाव वेगात आलेला कंटेनर (क्र. MH 12 VT 1455) घुसला. चालकाला झोप लागल्याने कंटेनर महामार्गाने चाललेल्या दिंडीत घुसल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात तीन वारकरी जागीच ठार झाले तर नऊजण जखमी झाले.

या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची अद्याप ओळख पटली नसून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वारकऱ्यांना चिरडणाऱ्या कंटेनरची परिसरातील संतप्त झालेल्या नागरिकांनी तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. कार्तिकी एकादशीला आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news