![ठाणे जिल्ह्यात सात उमेदवारांनी भरले अर्ज](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2Funnamed-file-209.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गेली 10 वर्ष काम करण्याची संधी मला दिली. मी अनेक विकास कामे केली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. यावेळी मतदार मला काम करण्याची संधी देतील याची खात्री आहे.-राजन विचारेयंदा निष्ठावान वाघाची आणि गद्दारांची लढाई आहे, सर्वात जास्त लीड घेतल्या शिवाय राहणार नाही. दिघे साहेबांच्या ठाण्यात दाखवून देणार गद्दारीला क्षमा नाही.-वरुण सरदेसाईआम्ही बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहेत. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. ही लढाई निष्ठावंतांची आहे. ठाकरे यांच्यावर प्रेम करणार्यांची आहे.-मुजफ्फर हुसेनमोदी महत्त्वाचे मुद्दे बोलत नाहीत. त्यांनी 10 वर्ष फक्त फसवणूक केली आहे. जनता मूर्ख आहे असे त्यांना वाटत आहे. विकासाचे विषय बाजूला ठेऊन हिंदू-मुस्लिम सुरू केले आहे. 6 महिन्यांत सरकार बदलणार आहे. अति जास्त करू नका. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागाल तर आम्ही पण लक्षात ठेवू, काय गोळ्या घालायच्या आहेत त्या आताच घाला. आम्ही गांधींची औलाद आहोत.-जितेंद्र आव्हाड