![अधिर रंजन चौधरी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2F%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली ः राष्ट्रपतींना राष्ट्रपत्नी म्हणणारे काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी लोकसभआ अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी बिर्ला यांना लिहिले आहे. चौधरी यांनी पत्रात म्हटले आहे की, सदनात स्मृती इराणी ज्या प्रकारे राष्ट्रपतींचे नाव घेत होत्या, ते योग्य नव्हते. राष्ट्रपतींच्या पदाला शोभणारेही नव्हते. त्या राष्ट्रपती हा शब्द न वापरता, केवळ द्रौपदी मुर्मू या नावाने ओरडत होत्या.
हा राष्ट्रपतिपदाचा अपमान आहे. राष्ट्रपतिपदाची प्रतिष्ठा कायम राहावी, यासाठी इराणी यांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे. माझी हिंदी भाषा चांगली नसल्याने माझी जीभ घसरली. मला माझी चूक मान्य आहे आणि मी राष्ट्रपतींची माफीही मागितली आहे. चौधरी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.