पन्हाळा : राजू मुजावर कोल्हापूर शहरापासून अघव्या 30-32 किलोमीटर अंतरावर असलेल्या मसाई पठारावरील जैवविविधता आणखी समृद्ध होणार आहे. राज्य शासनाने 5.34 चौरस किलोमीटरचे मसाई पठार संरक्षित राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. राज्य वन्यजीव मंडळाने घेतलेल्या या निर्णयाने पर्यटक, वन्यप्रेमींना पर्वणीच मिळणार आहे.
पन्हाळा किल्ल्याच्या पश्चिमेस असलेले हे पठार दहा किलोमीटर लांब आणि सुमारे 200 ते 800 फूट रुंद आहे. जांभ्या दगडाच्या सात छोट्या पठारांनी मिळून बनलेेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँडपेक्षाही मोठे आहे. या परिसरातील वाड्यावस्त्यांवरील नागरिकांची ग्रामदैवी मसाईचे या पठारावर मंदिर आहे. यामुळे पठाराला मसाई पठार म्हणून ओळखले जाते. पठाराच्या उत्तरेस लेणीही आहेत. परिसरात जांभ्या दगडात खोदलेला तलावही आहे.
पठार तसेच या लेण्यांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पठाराच्या भूपृष्ठापासून 600 ते 700 मीटर खोल असणार्या दर्या, पावसाळ्यात सर्वदूर पसणारे धुके, घोंगावत रुंजी घालणारा वारा आणि श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ अनुभवण्यासाठी मसाई पठारावर येणार्या पर्यटकांची संख्याही प्रचंड आहे.
कास पठाराप्रमाणेच मसाई पठारही सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी नटून जाते. कास इतक्या प्रमाणात एकत्रित फुले नसली, तरी विखुरलेल्या या फुलांनी पठाराची वेगळी नजाकत अनुभवता येते. हे पठार संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केल्याने कास पठाराप्रमाणेच मसाई पठारही भविष्यात फुलांसाठी प्रसिद्ध होईल, अशीही शक्यता आहे.
काही दुर्मीळ वनस्पती, साप, स्थलांतरित पक्षी या पठारावर आढळून येतात. गवे, बिबट्या आणि विशेषत: घोरपड यासारख्या प्राण्याचा वावर पठारावर आहे. दुर्मीळ पैसे किडे, ड्रोसेरा ही वनस्पती यासह मसाई पठार म्हणजे गोवा, कर्नाटक आणि सह्याद्री व्याघ- प्रकल्पातील एक प्रमुख भ-मण मार्ग आहे. आता हे पठार संरक्षित झाल्याने भ-मण मार्गालाही चालना मिळणार आहे.
या निर्णयानंतर मसाई पठारावरील जैवविविधतेच्या संरक्षणाचा आराखडा तयार होईल. विविध जाती-प्रजातींचे प्राणी, फुले, पक्षी आदींच्या नैसर्गिक अधिवासाची कामे त्याद्वारे केली जाणार आहेत.
या पठारावर सर्वसामान्यांचा असणारा वावर बंद होणार नाही. मात्र, ठिकठिकाणी पठारावरील जैवविविधता समृद्ध करण्याचे प्रयत्न होतील. त्यातून कास पठारासारखेच फुलांचे आणखी एक पठार यानिमित्ताने विकसित होईल, सह्याद्री व्याघ- प्रकल्पातील मोठा भ-मणमार्ग निर्माण होईल, त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.