पुढारी वृत्तसेवा : राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे 'आनंद'. ऋषीकेश मुखर्जी यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट 1971 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि गाणी अजूनही लोकांना भावणारी आहेत. आता या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू असून दिग्दर्शक व कलाकार कोण असणार हे अद्याप ठरलेले नाही. दरम्यान, सोशल मीडियात अनेक लोकांनी या क्लासिक चित्रपटाचा रिमेक बनवला जाऊ नये, असे म्हटले आहे.