अदनान सामीवर भाऊ जुनैद खानचे गंभीर आरोप; म्हणाला…

अदनान सामीवर भाऊ जुनैद खानचे गंभीर आरोप; म्हणाला…

पुढारी ऑनलाईन : 'अदनानने भारताचे नागरिकत्व घेतले कारण येथे त्याला चांगले पैसे मिळतात, जे पाकिस्तानमध्ये मिळत नाहीत. आई ही भारतीय आहे, अदनानचा हा दावाही खोटा आहे. तर कॅनडात झालेल्या छापेमारी दरम्यान, अदनान तुरुंगातही जाऊन आला आहे. असा आरोप अदनान सामीचा भाऊ जुनैद सामी खानने केला आहे.

लोकप्रिय गायक अदनान सामी हा त्याच्या भारतीय नागरिकतेमुळे नेहमीच चर्चेत असतो. कुठे ना कुठे त्याचा विषय निघतो आणि अदनान सामीला ट्रोल करण्यास सुरुवात होते. दरम्यान, अदनान सामी आता त्याच्या भावाने केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आला आहे. भावाने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जुनैद अदनानला स्वार्थी, खोटाडा म्हटले आहे.

इतकेच काय तर अदनानची डिग्री सुद्धा खोटी असल्याचे त्याने म्हटले आहे. जुनैदने सांगितले आहे की, 'अदनानचा जन्म १५ ऑगस्ट १९६९ रोजी रावळपिंडी येथील रूग्णालयात झाला होता. माझा जन्म १९७३ मध्ये त्याच रुग्णालयात झाला. त्यामुळे अदनानचा जन्म इंग्लंड किंवा इतर कोणत्याही ठिकाणी झाल्याचा दावा हा खोटा आहे.' असेही त्याने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news