![राज्यातील प्रकल्पांची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार : उदय सामंत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2F%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान, विरोधकांकडून गेल्या जाणाऱ्या आरोपांवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (दि.१) पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. राज्यातील प्रकल्पाची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. त्यानंतर कोण खरे आणि कोण खोट, हे समजेल, असे सामंत यांनी म्हटले आहे.