पैलवानांनी पदके नदीचा विसर्जित करण्याचा जो निर्णय घेतला होता, तो क्लेशदायक होता, असे सांगून 82 च्या विश्वकप विजेत्या संघातील क्रिकेटपटू पुढे म्हणतात की, कित्येक वर्षांचा प्रयत्न, संकल्प, बलिदान आणि धैर्यातून ही पदके खेळाडूंनी मिळवलेली आहेत. यात केवळ त्यांचा नाही तर देशाचा गौरव झालेला आहे. त्यांनी कुस्तीपटूंनी कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. सरकारकडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व त्यावर मार्ग निघेल, अशी आशा आहे. देशाला कायद्यानुसार इतकीच आमची अपेक्षा आहे.