पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात विदर्भात गारपीट सुरू असल्याने तेथील कमाल तापमान गेल्या पंधरा वर्षांत नीचांकी ठरले असून तेथील पारा 43 अंशांवरून थेट 33 ते 35 अंशांवर आला आहे. दरम्यान, उर्वरित राज्यात मात्र उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारी मालेगावचा पारा 42 अंशांवर गेला होता. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा मुक्काम येत्या गुरुवारपर्यंत वाढला आहे.
यंदा विदर्भात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गारपीट अन् पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथील कमाल तापमान 8 ते 9 अंशांनी घटले आहे. 1 ते 4 एप्रिलपर्यंत त्या भागातील पारा 42 अंशांवर गेला होता. यवतमाळ, गोंदिया, वाशिमचा पारा 41 ते 42 अंशांवर होता. मात्र गेल्या पाच दिवसांत पाऊस अन् गारपिटीने चित्रच बदलले आहे. शुक्रवारी येथील सरासरी कमाल तापमान 33 ते 35 अंशांवर आले होते.
विदर्भ : गारपीट अन् हलका पाऊस : 18 एप्रिलपर्यंत., मराठवाडा : हलका ते मध्यम पाऊस : 18 एप्रिलपर्यंत.,मध्य महाराष्ट्र : हलका पाऊस : 18 एप्रिलपर्यंत.
कोल्हापूर 38.2, मालेगाव 42, पुणे 39.5, मुंबई 33, अहमदनगर 39.8, जळगाव 38, महाबळेश्वर 33.4, नाशिक 37.8, सांगली 38.9, सातारा 39.1 सोलापूर 40,धाराशिव 39.5, छत्रपती संभाजीनगर 38.6.
हेही वाचा