भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद शिंदे गटात उमटले असून, माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू देखील आता या वादात उतरले आहेत. बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर भाजपच्या आमदारांना मंत्री म्हणून काम करण्याची संधीच मिळाली नसती. भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.