file photo
file photo

केंद्र सरकारने २० टक्के जास्त जमविला कांद्याचा बफर स्टॉक

Published on
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला तर लोकांना वेळीच त्याचा पुरवठा करता यावा, यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के जास्त बफर स्टॉक केला असल्याची माहिती ग्राहक विषयक खात्याचे सचिव रोहितकुमार सिंग यांनी रविवारी (दि. १६) दिली.
कांदा जास्त काळ टिकून रहावा, यासाठी भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात प्रायोगिक चाचण्या सुरु असल्याची माहितीही सिंग यांनी दिली. वर्ष 2022-23 मध्ये सरकारने 2.51 लाख टन इतक्या कांद्याचा बफर स्टॉक केला होता. त्या तुलनेत यंदा तीन लाख टन इतका बफर स्टॉक करण्यात आला आहे.

टोमॅटो विक्री दर दहा रुपयांनी कमी

दरम्यान दिल्लीसह काही इतर मोजक्या शहरात सरकारी संस्थांकडून टोमॅटोची सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू झाली आहे. सरकारने विक्रीसाठी 90 रुपये प्रती किलो इतका दर निश्चित केला होता. हा दर आता 10 रुपयांनी कमी करून 80 रुपये इतका करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news