तळेगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्यात एसटी कामगारांचा संप गेले चार महिने सुरू आहे. यावर अजूनही प्रशासनाकडून तोडगा निघालेला नाही. याच दरम्यान पुण्यातील तळेगाव दाभाडे आगारातील कामगारांनी आज शनिवारी (दि.२६) रोजी धरणे आंदोलन धरत एसटी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. लालपरी ठप्प असल्यामुळे शाळकरी मुलांची आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची फारच गैरसोय होत आहे.
याच दरम्यान खाजगी बस व्यावसायिक जादा भाड्याची आकारणी करत असल्यामुळे प्रवाशांना अर्थिक भार सोसावा लागत आहे. यामुळे हा तिढा कधी सुटणार? या प्रतिक्षेत प्रवाशी आहेत. या संपामुळे बरेच दिवस झाल्याने पगार नसल्यामुळे एसटी कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचेही हाल होत आहेत. ( विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम )
तळेगाव येथील एसटी आगारासमोर कामगार सहकुटूंब धरणे आदोलन करत आहेत. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दीपक दगडखैर, प्रमोद नकाते, पांडुरंग बांदल आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळेगाव आगारात १७० च्या जवळपास कामगार संपावर आहेत. उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दिलेल्या ११. ३. २०२२ या तारखेकडे एसटी कामगारांचे आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचलंत का?